Wednesday, March 25, 2020

लॉकडाउन



आजची सकाळ काही वेगळीच आहे, सर्वजण चिंतेत आहेत, जी भिती आजपर्यंत ऐकून होतो ती आता हळूहळू अगदी आपल्या घराशेजरी येऊन थबकली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे सतत चर्चा करून यातून बाहेर कसे पडता येईल , या संकटाला जास्त हानी न होता लवकरात लवकर कसे थोपवता येईल यात गुंतले आहेत .नाक्या- नाक्यावर पोलिस थांबून प्रत्येक येणार्‍या जाणार्‍याची चौकशी करत आहेत . त्यांनी काही ठिकाणी धाडी टाकल्या आहेत व जे लोक संक्रमित आहेत त्यांना उचलून घेऊन जात आहेत.इकडे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड त्राण आला आहे. वैद्यकीय सेवा देणारे, त्यांना मदत करणारे , आंगणवाडी सेविका , होमेगार्ड यांना सतर्क राहायला संगितले आहे.फौजेलाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोज मरणारांची संख्या झपाट्याने वाढत आहे तसे तसे सर्वांच्या मनावरील ताण वाढत चालला आहे. सर्व नागरिकांना घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत . लोक जितके म्हणून राशन जमा करून ठेवता येईल तेवढे जमा करून ठेवत आहेत काय सांगावे किती दिवस असे जीव मुठीत धरून बसावे लागेल हे सांगता येत नाही. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करायचे.त्यांची पोरेबाळे उपाशी मरत आहेत. इकडे धन दंडग्यांना वेगळीच चिंता सतावत आहे शेअर बाजार रोज नीचांकी पातळीवर गडगड्त आहे . तुम्हाला वाटेल की मी हे तुम्हाला कुठल्या तरी युद्धाच्या पूर्वीची किंवा दरम्यानची गोष्ट सांगत आहे तर ते तसे नाही ही जागतिक स्थिति झाली आहे एका विषाणू मुळे. त्याचे नाव आहे Covid19 उर्फ कोरोना.

      देशापुढे अनेक संकटे येत असतात त्यात आर्थिक , सामाजिक ,युद्धजन्य परिस्थिति अशी अनेक असतात पण हे संकट वेगळेच आहे हे जागतिक संकट आहे आणि सारे जगच या संकटाने ग्रासले आहे. कोणालाही कल्पना नाही की अजून किती दिवस लागतील या भयंकर संकटातून बाहेर पडायला. हा रोग अजून किती बळी घेईल माहीत नाही. जातानाही ही पीडा अशी सहजच जाणार नाही त्याच्यामुळे खूप सारी आर्थिक संकटे ओढवतील करत सारे जगच याने थांबवून ठेवले आहे सारे उद्योग धंदे बंद पडले आहेत.  

      जगभरात जे जे म्हणून प्रगत देश आहेत त्यांच्याकडे रोज मरणार्‍यांची संख्या जास्त आहे. त्यांनी ह्या आजाराला  खूप सहजतेने घेतले आणि त्याचा परिणाम महामारीत झाला. त्यामानाने भारतात सरकारने ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली अगदी पहिल्यापासून आणि या आजाराला समजात पसरू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू केले .त्याला जागतिक आरोग्य संघटनेने पण दाखल घेतली व भारताच्या प्रयत्नांना सलाम केला. कारण जेंव्हा जगभरातील पुढारलेल्या देशांमध्ये हजारो लोक मारत होते तेंव्हा भारतात एक ते दोन आकडी लोक मारत आहेत. पण हे सोप्पे  नाही इकडे लोक अशिक्षित आहेत जे शिकलेले आहेत ते नियम पळत नाहीत . बाहेर देशातून आले बहुतांश लोक संक्रमित आहेत त्यांना संगितले आहे की लोकांमध्ये मिसळू नका पण त्यातील काही लोक ऐकत नाहीत .त्यामुळे आत्तापर्यंत आटोक्यात असलेला रोग महामारीचे रूप धारण करू शकतो. तसे होऊ नये म्हणून सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले , कमधंदे बंद केले तरीही ओक ऐकत नव्हते म्हणून जमाव बंदी केली तरी लोक ऐकत नव्हते मग नाइलाजाने महिनाभर संन्चार बंदी केली , सर्व वाहतुकीचे मार्ग जसे हवाई वाहतूक, जल वाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक बंद केली. सर्व राज्यांनी आपापल्या सीमा बंद केल्या , सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या.

      अशा अडचणीच्या काळात देखील काही लोग आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात असतात . त्यांना देवाने काळीज दिलेलेच नसते जणू . जसे की hand sanitizer ( हात निर्जंतुक करण्याचा मलम ) चा काळाबाजार झाला , खराब गुणवत्ता असलेले मलम बाजारात आले . डोकटोरांना लागणारे मास्क चा साठा केला जाऊ लागला .कालच १.५ कोटी किमतीचा  मास्क साठा पोलिसांनी पकडला.

      चीन नंतर यूरोप मध्ये खूपच भयानक परिस्थिती आहे म्हणतात , त्यातल्या त्यात इटली मध्ये तर लोक या विषाणूमुळे धडाधड मरत आहेत. तिकडे आत्तापर्यंत 7 हजारच्या वर लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्यावर उपचार करायला इस्पितळे कमी पडत आहेत. जे लोक मेले आहेत त्यांना उचलायला कोणी पुढे येत नाही .सर्वत्र विषणूचा फैलाव झाला आहे.परिस्थिति खूपच गंभीर झाली आहे .अमेरिकेतही, इंग्लंड, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान सर्वत्र अशीच परिस्थिति आहे . पुढे काय होईल माहीत नाही पण सर्वांनाच याचा खूप मोठा फटका बसणार आहे हे नक्की . असे दिवस येतील असा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता . ऑलिंपिक स्पर्धा देखील कदाचित पुढे ढकलावी लागली आता ती स्पर्धा २०२१ मध्ये होईल . इतिहासामध्ये असे आत्तापर्यंत केवळ एकदा की दोनदाच घडले आहे म्हणजे विचार करा परिस्थिति किती गंभीर आहे .

      शेवटी देवाला एकच विनंती करावीशी वाटते की हे देवा या संकटातून सर्वांना लवकर बाहेर काढ .लहान मुले , वृध्द आणि तरुण एका जागेवर फार काळ बसू शकत नाहीत त्यांची यातून लवकर सुटका होउदे आणि ही परिस्थिति निवळल्यावर येणारी आर्थिक संकटे वेगळीच असतील ती झेलण्याची ताकत आम्हा सर्वांना दे ..........शुभम भवतू 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

लॉकडाउन

आजची सकाळ काही वेगळीच आहे , सर्वजण चिंतेत आहेत , जी भिती आजपर्यंत ऐकून होतो ती आता हळूहळू अगदी आपल्या घराशेजरी येऊन थबकली आहे. पंतप...