प्रेमाचा दिवस जवळ येत चालला आहे
(व्हॅलेंटाईन डे) तसे तसे बाजार अनेक वस्तूंनी सजत चलल्या आहेत. व्यापारी मंडळी या गोष्टींचा पुरेपूर फायदा
घेण्याचा प्रयत्न करतात.महाविद्यालयांमध्ये विविध दिवस (days) साजरे होऊ लागले आहेत. तरुण मुलांमध्ये तर याची खुपच क्रेझ
असते.आपल्याला आवडणारा मुलगा किंवा मुलगी यांना प्रपोज करणे त्याला किंवा तिला आपल्या प्रेमाची कबुली देणे या दिवसा मुळे खुपच
सोप्पे झाले आहे.
मला आठवते आहे काही वर्षांपूर्वी हा दिवस
साजरा करू नये म्हणून काही राजकीय पक्ष विरोध करत असत.त्यांचा विरोध एवढा टोकाचा
होता की ते कोणी युगुल एकत्र दिसले की ते त्यांना मारायचे. आता मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे, या दिवसाला समाज मान्यता मिळते आहे राजकीय पक्षांचा विरोध तर मवाळ झाला आहेच
परंतु कोणीही काही हरकत घेताना दिसत नाही.
याचीच अजुन एक दुसरी बाजु पण आहे. हा दिवस
खरेतर प्रेमाची कबुली देण्याचा आहे पण प्रामुख्याने याचा अर्थ फक्त एका पुरुषाचे
एका स्त्रीवरील प्रेम असाच घेतला जातो. खरे तर प्रेम हे कोणतेही असू शकते जसे की मित्राचे , भाऊ बहिणीचे, आई वडिलांचे आणि काही वेळा तर असे लक्षात येते की या
दिवसाचा खूपच विचित्र अर्थ घेऊन तरुण मुले मुली शारीरिक भुक भागविण्याचा दिवस असा काढतात मग
औषधाच्या दुकानांमध्ये गर्भनिरोधक वस्तू घेण्यासाठी रांगा लावताना पण दिसतात.
आयुष्यात काही लोकांना खुप प्रेम मिळते तर
काही बिच्चारे प्रेमाला पारखे असतात आणि आयुष्यभर तडफडत असतात ते प्रेम
मिळवण्यासाठी.तर दुसरीकडे काहींना खूप प्रेम मिळते पण त्यांना त्याची किंमत नसते.
मला वाटते प्रत्येकाला प्रेमाची गरज असते आयुष्यात पण ते योग्य वेळी योग्य प्रमाणात
मिळायला हवे.
नमस्कार भेटू
पुन्हा नव्या लेखात..