Sunday, March 8, 2020

महिला दिन


          

           आज जागतिक महिला दिन आहे, महिलांसाठी एक खास दिन .आपण हा दिन खरच का साजरा करतो ? आणि तो आपण साजरा करतो का ? पृथ्वीवरील मनुष्य जातीच्या आर्धी लोकसंख्या यांची आहे . खरेतर महिलांसाठी असा वेगळा दिन साजरा करायची गरजच का पडते ?
          आजही या विज्ञान युगात वाचायला, ऐकायला मिळते की महिलांना मंदिर प्रवेश नाकारला , महिलांना सैन्यात कायमस्वरूपी स्थान द्यावे काय ? महिलांना वेतांनाच्या बाबतीत दुजाभाव हा मुद्दा तर जागतिक स्तरावर गजतो आहे . महिलांचा हुंड्यासाठी छळ , कौटुंबिक छळ इत्यादि
          स्त्रियांना सर्वच स्तरांवर झगडावे लागते . अगदी कौटुंबिक , सामाजिक स्तरावर देखील. सुरुवात मुलीच्या जन्मापासून होते , मुलगी झालीतर नाके मुरडली जातात का तर ते दुसर्‍याचे धन . मग मुलगी जशी मोठी होत जाते तश्या तिच्यावरच्या जबाबदर्‍या वाढत जातात . तीने असेच वागावे , तसेच कपडे घालावेत , इकडे जाऊ नये , लवकर घरी यावे वगैरे वगैरे .लग्नाचे वय झाले तर पटकन लग्न उरकले तर ठीक नाहीतर मुलीच्या व्यक्तिमात्वावर शंका घेतली जाते . नंतर मुलबाळ झाले की नाही,अशी अनेक बंधने अंगावर घेऊन बिचारी सकाळ पासून संध्याकाळ पर्यन्त झगडत असते तरीही अश्या परिस्थितीत देखील अनेक महिला विविध स्तरांवर आपले नाव कामावताना दिसतात.
           फार दूरचेच कशाला घ्यायचे माजी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई मी लहानपणी बघायचो सकाळी लवकर उठून झडलोट करायची , आंघोळ उरकून जात्यावर दळण दळायची नंतर सगळ्यांचा स्वयंपाक करायची , तो उरकून शेतात जाऊन तिकडची सर्व कामे उन्हातान्हात करायची , संध्याकाळी परत आल्यावर स्वयंपाक , मग भांडी  घासयची अशी तिची दिनचर्या असायची नंतर सुना आल्या मदतीला पण तिची धावपळ काही थांबली नाही शेवट्पर्यंत .तीच तर्‍हा माझ्या आईची कधी गावाकडे गेलो तर दुरून पाणी आणावे लागे डोक्यावर . डोक्यावर म्हणजे एकावर एक दोन हांडे आणि काखेत एक कळशी.अशा पाच सहा खेपा कराव्या लगायच्या, मग स्वयंपाक, एकत्र कुटुंब असल्यामुळे घरात खूप सारे कपडे असायचे धुवायला ती सर्व कपडे घेऊन नदीवर जावे लागायचे . आणि आज माझी पत्नी सकाळी लवकर उठून मुलांचे डबे बनवायचे, माझा डबा बनवायचा, मग कपडे धुणे , भांडी घासणे, मुलांना शाळेतून घेऊन येणे, त्यांचा अभ्यास घेणे , बाजाऱ हाट यात संपूर्ण दिवस जातो मग परत रात्रीचे जेवण परत भांडी घासणे इत्यादि ...हा पाढा काही संपत नाही . एवढेच नाही ऑफिस मध्ये देखील मी बघतो काही महिला सहकारी घरचे काम उरकून सकाळीच ऑफिसला येतात तिकडे त्यांना अफाट काम असते कधी कधी घरी जायला खूप उशीर होतो पण त्यांना कधीच तक्रार करताना बघितले नाही.त्यांनाच काय वरील कुठल्याही स्त्रीला तक्रार करताना मी बघितले नाही .
           अशा सर्व स्त्रियांना मला सलाम करावा वाटतो .पण खरच त्यांना आपण ज्ञाय देऊ शकतो का हा प्रश्न पडतो . कारण आपण नेहमीच त्यांची चेष्टा उडवत असतो त्यांच्या अकार्यक्षमतेविषयी . महिलांना गाड्या नीट चालवता येत नाहीत , प्रशासनात त्या काय दिवे लावणार ? हिशोबतील त्यांना काय कळते , त्यांना समानता कशाला हवी आहे त्या डोक्यावर बसतील वगैरे वगैरे जोपर्यन्त ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण त्यांना पूर्ण ज्ञाय दिला असे होणार नाही . जेंव्हा आपण त्यांचा योग्य सन्मान करू तेंव्हा आपल्याला जागतिक महिला दिन साजरा करावा लागणार नाही .

लॉकडाउन

आजची सकाळ काही वेगळीच आहे , सर्वजण चिंतेत आहेत , जी भिती आजपर्यंत ऐकून होतो ती आता हळूहळू अगदी आपल्या घराशेजरी येऊन थबकली आहे. पंतप...