राम राम मंडळी हा माझा पहिलाच ब्लॉग आहे...खूप
दिवस मनात होते की काहीतरी ऑनलाईन लिहावे,खूप विचार दरवळत असतात मनाच्या या कुपीत त्याचा सुगंध सर्वांपर्यंत दरावळाव ही
ईच्छा होतीच.बघुयात आता कसे जमते ते. मी जे जे सुचेल जसे जसे सुचेल तसे लिहित जाणार आहे. लेख लिहिण्याचा छंद मला
तसा लहानपणापासूनच आहे परंतु कामाच्या व्यापात काही लिहिण्याचा संबंधच राहत नाही.त्यातल्या
त्यात मराठी वाचन आता फक्त सकाळी वर्तमानपत्र वाचे पर्यंतच राहिला आहे. माझा लेखन प्रपंच किती
वाचक वाचतील आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील याबद्दल माझ्या मनात
कुतूहल जरूर आहे,पण मी ठरवले आहे त्याचा
फार विचार करायचा नाही आणि फार दडपण पण मनावर येऊ द्यायचे नाही.ईश्वर चरणी एकाच
प्रार्थना आहे की मला छान छान विषय सुचूदेत आणि या माध्यमातून मला लोकांपर्यंत
पोहोचवू दे.
या माध्यमातून जे काही विचार मी मांडणार
आहे ते संपूर्णपणे माझे विचार असतील कदाचित ते काही वाचकांना पटणारनाहीत, त्यात असंख्य
व्याकरणाच्या किंवा लेखनाच्या चुका असतील पण वडिलकीच्या नात्याने त्यांनी मला
समजून घेऊनमाफ करावे ही प्रार्थना.हा खटाटोप करताना एक लक्षात आले की हे प्रकरण
वाटते तेवढे सोपे नाही, सुरवात मराठी फॉन्ट शोधण्यापासून झाली, खूप शोधला पण सापडला
नाही.मग नाईलाजाने मी हे सर्व आता मोबाईल फोनवर टाईप करतो आहे.पण या अडचणींची चिंता नाही वाटत
कारण काही तरी नवीन करतो आहे याचीच जास्त मजा वाटते आहे.
मी माझ्या सर्व मित्र
मैत्रिणींना आनंदाने एक गोष्ट सांगणार आहे , हीच कि मी आता ब्लॉग रायटर झालो आहे आणिपुढे माझे लेख
वाचून कदाचित काही नवीन काही मित्र व नवीन माहिती देणारे गुरु भेटतील. काही लोक समीक्षा करून टीका करतीलही पण माझा
प्रयत्न माझे लिखाण अधिकाधिक सुधारवण्याकडे असेल. चला एवढेच हितगुज मला तुमच्याशी करायचे होते .
एक नवा अध्याय सुरु होतो आहे तुमच्याही शुभेच्छा
असूदेत. मनःपूर्वक धन्यवाद
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.