Sunday, February 9, 2020

व्हॅलेंटाईन डे



                       प्रेमाचा दिवस जवळ येत चालला आहे (व्हॅलेंटाईन डे) तसे तसे बाजार अनेक वस्तूंनी सजत चलल्या आहेत. व्यापारी मंडळी या गोष्टींचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात.महाविद्यालयांमध्ये विविध दिवस (days) साजरे होऊ लागले आहेत. तरुण मुलांमध्ये तर याची खुपच क्रेझ असते.आपल्याला आवडणारा मुलगा किंवा मुलगी यांना  प्रपोज करणे त्याला किंवा तिला आपल्या प्रेमाची कबुली देणे या दिवसा मुळे खुपच सोप्पे झाले आहे. 
                      मला आठवते आहे काही वर्षांपूर्वी हा दिवस साजरा करू नये म्हणून काही राजकीय पक्ष विरोध करत असत.त्यांचा विरोध एवढा टोकाचा होता की ते कोणी युगुल एकत्र दिसले की ते त्यांना मारायचे. आता मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे, या दिवसाला समाज मान्यता मिळते आहे राजकीय पक्षांचा विरोध तर मवाळ झाला आहेच परंतु कोणीही काही हरकत घेताना दिसत नाही.
                      याचीच अजुन एक दुसरी बाजु पण आहे. हा दिवस खरेतर प्रेमाची कबुली देण्याचा आहे पण प्रामुख्याने याचा अर्थ फक्त एका पुरुषाचे एका स्त्रीवरील प्रेम असाच घेतला जातो. खरे तर प्रेम हे कोणतेही असू शकते जसे की मित्राचे , भाऊ बहिणीचे, आई वडिलांचे  आणि काही वेळा तर असे लक्षात येते की या दिवसाचा खूपच विचित्र अर्थ घेऊन तरुण मुले मुली शारीरिक भुक भागविण्याचा दिवस असा काढतात मग औषधाच्या दुकानांमध्ये गर्भनिरोधक वस्तू घेण्यासाठी रांगा लावताना पण दिसतात.
                      आयुष्यात काही लोकांना खुप प्रेम मिळते तर काही बिच्चारे प्रेमाला पारखे असतात आणि आयुष्यभर तडफडत असतात ते प्रेम मिळवण्यासाठी.तर दुसरीकडे काहींना खूप प्रेम मिळते पण त्यांना त्याची किंमत नसते. मला वाटते प्रत्येकाला प्रेमाची गरज असते आयुष्यात पण ते योग्य वेळी योग्य प्रमाणात मिळायला हवे.
नमस्कार भेटू पुन्हा नव्या लेखात..

Saturday, February 8, 2020

श्री गणेशा




               राम राम मंडळी हा माझा पहिलाच ब्लॉग आहे...खूप दिवस मनात होते की काहीतरी ऑनलाईन लिहावे,खूप विचार दरवळत असतात मनाच्या या कुपीत त्याचा सुगंध सर्वांपर्यंत दरावळाव ही ईच्छा होतीच.बघुयात आता कसे जमते ते. मी जे जे सुचेल जसे जसे सुचेल तसे लिहित जाणार आहे. लेख लिहिण्याचा छंद मला तसा लहानपणापासूनच आहे परंतु कामाच्या व्यापात काही लिहिण्याचा संबंधच राहत नाही.त्यातल्या त्यात मराठी वाचन आता फक्त सकाळी वर्तमानपत्र वाचे पर्यंतच राहिला आहे. माझा लेखन प्रपंच किती वाचक वाचतील आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील याबद्दल माझ्या मनात कुतूहल जरूर आहे,पण मी ठरवले आहे त्याचा फार विचार करायचा नाही आणि फार दडपण पण मनावर येऊ द्यायचे नाही.ईश्वर चरणी एकाच प्रार्थना आहे की मला छान छान विषय सुचूदेत आणि या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचवू दे.
                               या माध्यमातून जे  काही विचार मी मांडणार आहे ते संपूर्णपणे माझे विचार असतील कदाचित ते काही वाचकांना पटणारनाहीत, त्यात असंख्य व्याकरणाच्या किंवा लेखनाच्या चुका असतील पण वडिलकीच्या नात्याने त्यांनी मला समजून घेऊनमाफ करावे ही प्रार्थना.हा खटाटोप करताना एक लक्षात आले की हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही, सुरवात मराठी फॉन्ट शोधण्यापासून झाली, खूप शोधला पण सापडला नाही.मग नाईलाजाने मी हे सर्व आता मोबाईल फोनवर टाईप करतो आहे.पण या अडचणींची चिंता नाही वाटत कारण काही तरी नवीन करतो आहे याचीच जास्त मजा वाटते आहे.  
                             मी माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना आनंदाने एक गोष्ट सांगणार आहे , हीच कि मी आता ब्लॉग रायटर झालो आहे आणिपुढे माझे लेख वाचून कदाचित काही नवीन काही मित्र व नवीन माहिती देणारे गुरु भेटतील. काही लोक समीक्षा करून टीका करतीलही पण माझा प्रयत्न माझे लिखाण अधिकाधिक सुधारवण्याकडे असेल. चला एवढेच हितगुज मला तुमच्याशी करायचे होते .

एक नवा अध्याय सुरु होतो आहे तुमच्याही शुभेच्छा असूदेत. मनःपूर्वक धन्यवाद

लॉकडाउन

आजची सकाळ काही वेगळीच आहे , सर्वजण चिंतेत आहेत , जी भिती आजपर्यंत ऐकून होतो ती आता हळूहळू अगदी आपल्या घराशेजरी येऊन थबकली आहे. पंतप...